
समाजातील सर्वात वंचित उपेक्षित आणि दुर्बल घटकांच्या उन्नतीशिवाय राष्ट्राची प्रगती अपूर्ण राहते ही भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची ठाम भूमिका होती अशी भावना डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी बोलताना व्यक्त केली.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भाजपा नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी अत्यंत उत्साहात आंबेडकर जयंती साजरी केली. कार्यक्रमाची सुरुवात प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. ममता पिपाडा यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाला आरपीआयचे नेते दिलीपराव वाघमारे, मदनलाल पिपाडा, सचिन वाघमारे, प्रशांत पवार, नरेंद्र पिपाडा, सिद्धार्थ वाघमारे, महावीर पिपाडा, किशोर वाघमारे, श्रृती पिपाडा, अशोक लोखंडे, निखील पिपाडा यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रसंगी भाजपा नेते डॉ. राजेंद्र पिपाडा आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, समाजातील सर्वात वंचित उपेक्षित आणि दुर्बल घटकांच्या उन्नतीशिवाय राष्ट्राची प्रगती अपूर्ण राहते ही भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची ठाम भूमिका होती या विचारातुनच सर्व समावेश या विचारातूनच सर्वसमावेशक आणि समताधिष्टीत विकासाची दिशा निश्चित होते प्रत्येक घटकाला सन्मानाने जगण्याची संधी मिळणे हीच खऱ्या अर्थाने राष्ट्रन्नतीची ओळख आहे भारताचा विकास हा केवळ आर्थिक प्रगतीपुरता मर्यादित नसून तो सामाजिक न्याय आणि समतेच्या मूल्यावर आधारलेला असावा हे त्यांनी स्पष्ट केले होते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण संघटन आणि संघर्ष या त्रीसूत्रीचा पुरस्कार केला त्यांनी शिक्षणाला वैयक्तिक उन्नती पुरते मर्यादित न ठेवता सामाजिक परिवर्तन आणि राष्ट्र निर्मितीचे प्रभावी साधन मानले आज भारत ज्ञानदीप अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असताना त्यांच्या या विचारांचे महत्त्व अधिकच अधोरेखित होते. जागरूक सुशिक्षित आणि संघटित समाज हीच राष्ट्र उन्नतीची खरी गुरुकिल्ली आहे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.

पुढे बोलतना म्हणाले की आपल्या मनोगतातून बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, बंधुता व न्याय या मूल्यांवर आधारित विचारसरणीचा समाजाने स्वीकार करणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, बाबासाहेबांचे कार्य हे केवळ एका समाजापुरते मर्यादित नसून संपूर्ण राष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे. यावेळी भाजपा नेते डॉ.राजेंद्र पिपाडा,दिलीपराव वाघमारे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जयघोष केला. सर्व उपस्थितांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या विचारांचा अंगीकार करण्याचा संकल्प केला. कार्यक्रम शांततापूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.




















