जीवनाचा आस्वादघेताआला पाहिजे —-प्रमोद तोरणे कोपरगाव -मानवी जीवन सुखदुःखांनी,आनंदाने,समाधानाने, तृप्ती ने भरलेले असते जीवनात प्रचंड चढउतार असतात ते आपण पार केले पाहिजे त्या दृष्टीने मनाची तयारी ठेवावी असे आव्हान रयत शिक्षण संस्था सहाय्यक विभाग अधिकारी प्रमुख तोरणे यांनी केले. मारुती राव तिडके विद्यालय चालनळी येथील आजी माजी सेवकांचा स्नेह मेळावा कोपरगाव येथे आयोजित केला होता त्याप्रसंगी अध्यक्ष पदावरून ते बोलत होते ते पुढे म्हणाले की मानवी जीवनात एकाकीपणा हा वाईट असतो एकटेपणामुळेच लोक व्यसनाधीन व मोबाईलचे मानसिक विकार होतात म्हणून चांगले मित्र मिळवा मागचा इतिहास उकळत बसू नका वर्तमानात जगा असा मौलिक संदेश श्री तोरणे यांनी दिला चास नळी ता कोपरगाव तिडके विद्यालयातील माजी आ जी सेवकांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी अनेक गुरुबंधू उपस्थित होते प्रारंभी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक रयत बँकेचे माजी संचालक सुखदेव काळे यांनी केले सर्वांनी आपापली ओळख करून दिली सध्या आपण काय करत आहोत हे सांगितले आलेल्या सर्वांचा सर्व संयोजकाच्या वतीने सत्कार करण्यात आला याप्रसंगी चांगदेव कडू डोईफोडे जामदार शरद अंबिलवादे डोईफोडे शरद गायकवाड यांची भाषणे झाली श्री चांगदेव कडू म्हणाले की आनंदाने जगणे फार महत्त्वाचे झाले आहे स्वतःसाठी वेळ द्या आपल्याला झेपेल इतका व्यायाम करा स्वतःला जास्त त्रास करून घेऊ नका श्री सुखदेव काळे म्हणाले की काम आणि अर्थ यापासून वय झाले लोकांनी दूर राहिले पाहिजे कार्यक्रमाचे सूत्रंसंचालन निकम यांनी केली तर आभार प्रदर्शन शरद आंबील वादे. यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुखदेव काळे शरद आंबील वादे एस एम खंडीझोड शरद गायकवाड वैद्य कैलास थोरात धनराज बागल विलास वाकचौरे यांनी परिश्रम घेतले पुढील वर्षी भेटण्याचे आश्वासन देऊन कार्यक्रमाची सांगता झाली





















