विद्यार्थ्यांच्या खेळगुणांना व्यासपीठ मिळवून देणारा उपक्रम
शिर्डी: राहाता तालुक्यातील
कोहाळे येथे श्री गणेश शैक्षणिक संकुलाच्या वतीने “खेलो श्री गणेश -क्रीडा महोत्सव २०२५” चे आयोजन करण्यात आले असून, या महोत्सवाचा शुभारंभ ४ ऑगस्ट रोजी उत्साहात झाला. २५ ऑगस्टपर्यंत सुरू राहणाऱ्या या क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांना त्यांच्या खेळगुणांना सादर करण्याची संधी मिळणार असून, विविध खेळांतून त्यांची गुणवत्ता आणि जिद्द समोर येणार आहे. स्पर्धेचा हा माहोल विद्याथ्यांसाठी आनंद, प्रेरणा आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे.
या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते सर्जेराव मते, शारदा विद्या मंदिरचे प्राचार्य अनिल बनसोडे तसेच संस्थेचे अध्यक्ष प्रा. विजय शेटे, उपाध्यक्ष संदीप चौधरी, सचिव
नेमीचंद लोढा, विश्वस्त कामिनी शेटे, भारत शेटे, रवींद्र चौधरी, सुरेश गमे, देविदास दळवी, महावीर शिंगवी, संदीप सोनिर्मिडे, पंकज मुथा, योगेश मूनावत, स्वप्निल लोढा, चिराग पटेल, आकाश छाजेड, गणेश कुन्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे सर्जेराव मते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, खेळ म्हणजे केवळ स्पर्धा नसून तो व्यक्तिमत्व विकासाची एक शाळा आहे. खेळ हे जीवनाचे महत्त्वाचे अंग आहे आणि विद्यार्थ्यांनी शारीरिक व मानसिक संतुलन राखण्यासाठी खेळळाकडे
गांभीर्याने पाहावे. यावेळी प्राचार्य अनिल बनसोडे यांनी खेळाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, खेळ हे केवळ शरीरासाठी उपयुक्त नसून ते संयम, निर्णयक्षमता आणि टीमवर्क यांसारख्या मूलभूत जीवनगुणांचा विकास करतात. या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी श्री गणेश ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सागर हिंगे, श्री गणेश इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य रामनाथ पाचोरे, श्री गणेश इंग्लिश मीडियम गुरुकुलचे प्राचार्य संजय दिवटे, प्राचार्य नेहा पहाडे, उपप्राचार्य प्रा. योगेश फटांगरे, प्रा. नंदलाल आहेर, प्रा.
सुनील गोर्डे, प्रा. प्रवीण दहे, प्रा. रियाज शेख, प्रा. रोहिणी घोरपडे, प्रा.साहिल सैय्यद,प्रा. बापू पुणेकर आणि शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले. प्रा. विजय शेटे यांनी सांगितले की, खेळामुळे अनुशासन, नेतृत्व, सहकार्य आणि आत्मविश्वास यांचा विकास होतो. विद्याथ्यांना या महोत्सवातून याचा निश्चितच अनुभव क्रीडाक्षेत्रही विद्याध्यर्थ्यांसाठी महत्त्वाचे आहे. च अनुभव येईल. स्पर्धा परीक्षांइतकेच महाविद्यालयामध्ये अशा उपक्रमांद्वारे विद्याथ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा ि आमचा प्रयत्न आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.




















