
राहाता ( प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्याचे लाडके नेतृत्व आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याच पार्श्वभूमीवर येथील श्री विरभद्र मंदिरा समोरील प्रांगणात ग्रामस्थांच्या वतीने सामूहिक शोक सभेचे आयोजन करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दुपारी बारा वाजेपर्यंत शहरातील व्यावसायिकांनी ही दुकाने बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी सर्वपक्षीय मान्यवरांनी भावना व्यक्त करताना सांगितले की महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचा आणि विकास कामाचा ध्यास असलेले नेतृत्व हरपले आहे तसेच कोणत्याही कामावर वेळेत काम करण्याची त्यांची शिस्तबद्ध सवय होती त्यांनी कुठल्याही जातीपातीचे राजकारण न करता सर्व समावेशक राजकारण करत गोरगरीबांना मदत केली मग तो विरोधी पक्षाचा असला तरी त्यांना मदत केली वैयक्तिक कामापेक्षा सार्वजनिक कामाला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले. प्रशासकीय कामांवर व अधिकाऱ्यांवर त्यांचा नेहमीच वचक होता.
राहता शहर विकासासाठी ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या साथीने कै अजितदादांनी केलेल्या कामाचे सुद्धा यावेळी अनेकांनी वक्तव्य केले.
शुक्रवारी सर्व पक्षांच्या वतीने राहाता शहर बंद ठेवण्यात आले होते व्यापाऱ्यांनी बंदला १००% प्रतिसाद देऊन श्रद्धांजली मध्ये सहभाग घेतला.
शोक सभेनंतर सर्वांनी दोन मिनिटे उभे राहून कै.अजित दादा पवार तसेच कॅप्टन सुमित कपूर – पायलट इन कमांड, कॅप्टन शांभवी पाठक – सह-पायलट,विधीत जाधव – वैयक्तिक सुरक्षा रक्षक (PSO)
पिंकी माळी – फ्लाईट अटेंडंटविमान अपघातात काळाच्या पडद्याआड गेलेल्या,कर्तव्य बजावताना आणि नियतीच्या खेळात प्राण गमावलेल्या या पाचही व्यक्तींना अत्यंत शोकाकुल वातावरणात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

उपनगराध्यक्ष विजय सदाफळ ,गटनेते मुन्नाभाई शहा , माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ ,साहेबराव निधाने,नानासाहेब बावके ,डॉ. के. वाय.गाडेकर,नगरसेवक, दशरथ तुपे, शशिकांत लोळगे,प्रवीण रुणवाल,ॲड.ऋषिकेश पाळंदे,ॲड. रघुनाथ मोठे, मोहनराव सदाफळ,ॲड .नारायणराव कार्ले,ॲड.रामनाथ सदाफळ ,मुकुंदनाना सदाफळ ,संजय सदाफळ,बजरंग दलाचे मुर्तडक आदींनी शब्दरूपाने श्रद्धांजली अर्पण केली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र निकाळे यांनी तर आभार राजेंद्र वाबळे यांनी मानले.




















