Homeताज्या बातम्याअहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित ४३७ विहिरींसाठी ६३ लाखांचा निधी मंजूर पालकमंत्र्यांच्या हस्ते...

अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित ४३७ विहिरींसाठी ६३ लाखांचा निधी मंजूर पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात निधीचे वितरण

 

अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित ४३७ विहिरींसाठी ६३ लाखांचा निधी मंजूर

पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात निधीचे वितरण

अहिल्यानगर, दि. ५ :- सन २०२५-२६ च्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या जिल्ह्यातील ४३७ शेत विहिरींच्या दुरुस्तीसाठी शासनाने ६३ लाख १० हजार ६८३ रुपयांचा निधी मंजूर करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. या मदतीचे वितरण आज पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सहा शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश देऊन करण्यात आले असून जिल्हाधिकाऱ्यांनी उर्वरित निधीचे वाटप १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

खरीप हंगामात राज्यात व जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी गाळाने बुजल्या होत्या अथवा खचल्या होत्या. यामुळे रब्बी हंगामात पिकांच्या सिंचनासाठी शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली होती. यावर उपाययोजना म्हणून राज्य शासनाच्या नियोजन विभागाने १३ ऑक्टोबर २०२५ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार मदत जाहीर केली आहे. या निर्णयान्वये बाधित विहिरींच्या दुरुस्तीसाठी प्रत्यक्ष आलेला खर्च किंवा कमाल ३० हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल, ती मदत म्हणून देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गटविकास अधिकाऱ्यांमार्फत प्राप्त झालेल्या अहवालानुसार पहिल्या टप्प्यात ४३७ विहिरी पात्र ठरल्या आहेत. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये या निधीचे वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये सर्वाधिक फटका बसलेल्या जामखेड तालुक्यातील १२८ विहिरींसाठी १८ लाख ६८ हजार ७८ रुपये, शेवगावमधील १११ विहिरींसाठी १६ लाख ४८ हजार २०६ रुपये, राहुरीतील ४९ विहिरींसाठी ७ लाख ३२ हजार ८४४ रुपये, श्रीरामपूरमधील ४६ विहिरींसाठी ६ लाख ६० हजार ६०३ रुपये, नेवासा येथील ४३ विहिरींसाठी ५ लाख १० हजार ८६४ रुपये, संगमनेरमधील २१ विहिरींसाठी ३ लाख १४ हजार ७६ रुपये, कोपरगावच्या १२ विहिरींसाठी ४ लाख ४ हजार ४०० रुपये व पारनेरच्या १२ विहिरींसाठी १ लाख ७१ हजार ६१२ रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

या निधी वितरण कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी प्रशासनाला गतीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. उर्वरित सर्व पात्र विहिरींचे प्रस्ताव तातडीने सादर करून येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत सर्व बाधित शेतकऱ्यांना रक्कमेचे वाटप पूर्ण करावे, असे सक्त निर्देश त्यांनी संबंधित गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. यावेळी कृषी विभाग, आत्मा, पशुसंर्वधन विभाग व जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

********

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बुद्ध पौर्णिमा 2026: बुद्धाच्या शिकवणी 2026 मध्ये नेहमीपेक्षा अधिक प्रासंगिक का आहेत

बुद्ध पौर्णिमा, गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण साजरी करणारा तिहेरी-आशीर्वादित दिवस, त्यांच्या शिकवणींची शाश्वत प्रासंगिकता अधोरेखित करतो. आजच्या जगात, जलद बदल आणि...

वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने रावेत, किवळे रहिवासी, नगरसेवक महावितरणच्या अधिकाऱ्यांना भेटले

पुणे : रावेत आणि किवळे येथील रहिवाशांनी स्थानिक नगरसेविका ऐश्वर्या तरस यांच्यासह बुधवारी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण कंपनी लिमिटेड) च्या अधिकाऱ्यांची...

रियान पराग वापिंग पंक्तीः महिला गटाची चौकशीची मागणी

रियान पराग (इमेज क्रेडिट: एक्स) नवी दिल्ली: राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग मुल्लानपूर क्रिकेट स्टेडियमवर पंजाब किंग्ज विरुद्धच्या राजस्थान रॉयल्सच्या सामन्यादरम्यान ड्रेसिंग...

IPL 2026: रियान परागला IPL सामन्यादरम्यान वाफ काढल्याबद्दल 25% दंड आणि 1 डिमेरिट पॉइंट...

नवी दिल्ली: राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग याला त्याच्या मॅच फीच्या 25 टक्के दंड आणि आयपीएल 2026 मध्ये राजस्थान रॉयल्स आणि पंजाब...

(जलयात्रा समारोप – महेश्वर) ————————————— जलयात्रेमुळे मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राचे नाते अधिक दृढ झाले-मुख्यमंत्री डॉ...

(जलयात्रा समारोप – महेश्वर) --------------------------------------- जलयात्रेमुळे मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राचे नाते अधिक दृढ झाले-मुख्यमंत्री डॉ यादव गोदा ते नर्मदा यात्रा महाराष्ट्रातील चौदा कोटी जनतेची-मंत्री बावनकुळे गोदा ते नर्मदा यात्रेतून...

बुद्ध पौर्णिमा 2026: बुद्धाच्या शिकवणी 2026 मध्ये नेहमीपेक्षा अधिक प्रासंगिक का आहेत

बुद्ध पौर्णिमा, गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण साजरी करणारा तिहेरी-आशीर्वादित दिवस, त्यांच्या शिकवणींची शाश्वत प्रासंगिकता अधोरेखित करतो. आजच्या जगात, जलद बदल आणि...

वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने रावेत, किवळे रहिवासी, नगरसेवक महावितरणच्या अधिकाऱ्यांना भेटले

पुणे : रावेत आणि किवळे येथील रहिवाशांनी स्थानिक नगरसेविका ऐश्वर्या तरस यांच्यासह बुधवारी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण कंपनी लिमिटेड) च्या अधिकाऱ्यांची...

रियान पराग वापिंग पंक्तीः महिला गटाची चौकशीची मागणी

रियान पराग (इमेज क्रेडिट: एक्स) नवी दिल्ली: राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग मुल्लानपूर क्रिकेट स्टेडियमवर पंजाब किंग्ज विरुद्धच्या राजस्थान रॉयल्सच्या सामन्यादरम्यान ड्रेसिंग...

IPL 2026: रियान परागला IPL सामन्यादरम्यान वाफ काढल्याबद्दल 25% दंड आणि 1 डिमेरिट पॉइंट...

नवी दिल्ली: राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग याला त्याच्या मॅच फीच्या 25 टक्के दंड आणि आयपीएल 2026 मध्ये राजस्थान रॉयल्स आणि पंजाब...

(जलयात्रा समारोप – महेश्वर) ————————————— जलयात्रेमुळे मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राचे नाते अधिक दृढ झाले-मुख्यमंत्री डॉ...

(जलयात्रा समारोप – महेश्वर) --------------------------------------- जलयात्रेमुळे मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राचे नाते अधिक दृढ झाले-मुख्यमंत्री डॉ यादव गोदा ते नर्मदा यात्रा महाराष्ट्रातील चौदा कोटी जनतेची-मंत्री बावनकुळे गोदा ते नर्मदा यात्रेतून...
error: Content is protected !!