
छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, दूरदृष्टी आणि लोकाभिमुख राज्यकारभार आजच्या पिढीसाठी आदर्श असल्याची भावना प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.ममता पिपाडा यांनी बोलताना व्यक्त केली. प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.ममता पिपाडा यांनी आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी भाजपाचे नेते डॉ.राजेंद्र पिपाडा,आरपीआयचे दिलीपराव वाघमारे,प्रगतशील शेतकरी शिवाजीराव आनप, मदनलालजी पिपाडा,महावीरजी पिपाडा,निखील पिपाडा आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना सौ.ममता पिपाडा म्हणाल्या की, शिवाजी महाराजांनी केवळ तलवारीच्या जोरावर राज्य उभारले नाही, तर उत्तम प्रशासन, लोककल्याण आणि स्त्री सन्मान यांना सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांनी किल्ल्यांची मजबूत व्यवस्था उभी केली, आरमार उभारले आणि शत्रूंना बुद्धी आणि पराक्रमाने पराभूत केले.
राज्यकारभारात स्त्रियांच्या सन्मानाला आणि सुरक्षेला अत्यंत उच्च स्थान होते. त्या काळात अनेक ठिकाणी स्त्रियांवर अन्याय होत असताना शिवाजी महाराजांनी स्पष्ट धोरणे आणि कठोर शिस्त लावून स्त्रीसन्मानाचे आदर्श उदाहरण घालून दिले. शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याला स्पष्ट आदेश दिले होते की शत्रूच्या प्रदेशातही स्त्रियांना कोणतीही हानी पोहोचवायची नाही. युद्धात जिंकलेल्या प्रदेशातील स्त्रियांना सन्मानाने त्यांच्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था केली जात असे.
शिवरायांचा राज्यकारभार हा सुयोजित प्रशासन, लोककल्याण, कठोर शिस्त आणि दूरदृष्टी यांचा आदर्श संगम होता. म्हणूनच त्यांचे स्वराज्य आजही आदर्श सुशासनाचे मॉडेल मानले जाते.
यावेळी उपस्थित सर्वांनी प्रतिमेचे पुजन करुन त्यांना अभिवादन केले.




















