येवला : प्रतिनिधी
येथील नगरपालिकेतर्फे शहरात नालेसफाई मोहीम राबविण्यात आली. मुख्याधिकारी तुषार आहेर यांनी शहरातील तुंबलेल्या नाल्याची पाहणी करून स्वच्छता विभागाला आदेश देऊन नालेसफाई केली. शहरात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी पावसाचा कहर अनुभवायला मिळाला. पावसामुळे रस्ते, गल्लीबोळ जलमय झाले होते. यंदा येवला नगरपरिषदेकडून मॉन्सूनपूर्व करण्यात आलेल्या नालेसफाईमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
नालेसफाई वेळेत केल्याने पावसाचे पाणी साचून राहिले नाही. पाणी तुंबण्याच्या समस्येवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले. शहरातील बाजारपेठ परिसर, मुख्य चौक, नगरपरिषद कार्यालयाभोवतालचा भाग व इंद्रनील डीजे रोड
इतर भागांत नागरिकांना पाणी उपसण्याच्या त्रासाला सामोरे जावे लागले नाही. नगरपरिषद मुख्याधिकारी आहेर यांनी आधीच नालेसफाई व जलनिस्सारणाची कामे युद्धपातळीवर करून घेतल्याने यंदा अतिवृष्टीच्या काळात शहर मोठ्या संकटातून वाचले आहे. त्यामुळे नागरिकांत समाधानाची भावना व्यक्त होत आहे. नगरपरिषदेच्या या दूरदृष्टीपूर्ण निर्णयाचे शहरातील विविध स्तरातून कौतुक होत आहे. याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी मुख्याधिकारी यांच्यासमवेत उपमुख्याधिकारी चंद्रकांत भोये, स्वच्छता निरीक्षक पूनम भामरे, दीपक जावळे, किरण अहिरे, शेखर शिंदे, नितीन आहेर संदीप बोढरे, गौरव चुंबळे, नितीन लोणारी, गोपी जावळे, राजेंद्र जांभूळकर, संजय गोसावी, राजू लोंढे, राजेश निकम, तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते




















