Homeताज्या बातम्यानगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त

नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त

*नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त*

*अहिल्यानगर, दि. ५ –* जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नेमणुकीस मंजुरी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी उपरोक्त आदेश जारी केले असून, या नेमणुका शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार केल्या आहेत.

निवडणुकांचे कामकाज पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. नियुक्त अधिकारी निवडणुकीदरम्यान शासकीय मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करणार आहेत.

जिल्ह्यातील कोपरगाव नगरपरिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती भारती सागरे (उपजिल्हाधिकारी) असतील. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महेश सावंत (तहसीलदार, कोपरगाव) व सुहास जगताप (मुख्याधिकारी, कोपरगाव नगरपरिषद) यांची नेमणूक करण्यात आली आहे.

संगमनेर नगरपरिषदेकरिता अरुण ऊंडे (उपविभागीय अधिकारी, संगमनेर) यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक झाली असून सहायक अधिकारी म्हणून धीरज मांजरे (तहसीलदार, संगमनेर) व श्रीमती धनश्री पवार (मुख्याधिकारी, अकोले नगरपंचायत) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

श्रीरामपूर नगरपरिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी किरण सावंत पाटील (उपविभागीय अधिकारी, श्रीरामपूर) असतील, तर सहायक अधिकारी म्हणून मिलींदकुमार वाघ (तहसीलदार, श्रीरामपूर) व मच्छिंद्र घोलप (मुख्याधिकारी, श्रीरामपूर नगरपरिषद) कार्यभार सांभाळतील.

जामखेड नगरपरिषदेकरिता नितिन पाटील (उपविभागीय अधिकारी, कर्जत-जामखेड) यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक झाली असून सहायक अधिकारी म्हणून अजय साळवे (मुख्याधिकारी, जामखेड नगरपरिषद) व मच्छिंद्र पाडळे (नायब तहसीलदार, जामखेड) यांची नेमणूक करण्यात आली आहे.

शेवगाव नगरपरिषदेकरिता प्रसाद मते (उपविभागीय अधिकारी, पाथर्डी-शेवगाव) यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक झाली असून सहायक अधिकारी म्हणून आकाश दहाडदे (तहसीलदार, शेवगाव) व श्रीमती विजया घाडगे (मुख्याधिकारी, शेवगाव नगरपरिषद) यांची नियुक्ती झाली आहे.

याशिवाय, पाथर्डी नगरपरिषदेकरिता सुभाष दळवी (उपजिल्हाधिकारी) यांची निवड झाली असून सहायक अधिकारी म्हणून उध्दव नाईक (तहसीलदार पाथर्डी) व दिग्विजय पाटील (नायब तहसीलदार, पाथर्डी) कार्यभार पाहतील.

राहाता नगरपरिषदेकरिता श्रीमती मनिषा राशीनकर (उपजिल्हाधिकारी) यांच्यासह सहायक अधिकारी अमोल मोरे (तहसीलदार, राहाता) व वैभव लोंढे (मुख्याधिकारी, राहाता नगरपरिषद) असतील.

राहुरी नगरपरिषदेकरिता अनुपसिंह यादव (उपजिल्हाधिकारी) निवडणूक निर्णय अधिकारी असतील, तर सहायक अधिकारी नामदेव पाटील (तहसीलदार, राहुरी) व सोपान बाचकर (नायब तहसीलदार,राहुरी) नेमले गेले आहेत.

देवळाली प्रवरा नगरपरिषदेकरिता श्रीमती गौरी सावंत (उपजिल्हाधिकारी) यांची निवड झाली असून सहायक अधिकारी म्हणून ऋषिकेश पाटील (मुख्याधिकारी, देवळाली प्रवरा नगरपरिषद) व डी.पी. शेकटकर (नायब तहसीलदार श्रीरामपूर) असतील.

नेवासा नगरपंचायतीकरिता सुधीर पाटील (उपविभागीय अधिकारी, अहिल्यानगर- नेवासा) यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक झाली असून सहायक अधिकारी संजय बिरादार (तहसीलदार, नेवासा) व निखिल फराटे (मुख्याधिकारी, नेवासा नगरपंचायत) असतील.

शिर्डी नगरपरिषदेकरिता माणिक आहेर (उपविभागीय अधिकारी, शिर्डी) निवडणूक निर्णय अधिकारी असतील; सहायक अधिकारी म्हणून सतिश दिघे (मुख्याधिकारी, शिर्डी नगरपरिषद) व बी.बी. मुळे (नायब तहसीलदार राहाता) यांची नियुक्ती झाली आहे.

श्रीगोंदा नगरपरिषदेकरिता श्री. श्रीकुमार चिंचकर (उपविभागीय अधिकारी, श्रीगोंदा-पारनेर) निवडणूक निर्णय अधिकारी असतील, तर सहायक अधिकारी म्हणून सचिन डोंगरे (तहसीलदार श्रीगोंदा) व श्रीमती पुष्पगंधा भगत (मुख्याधिकारी, श्रीगोंदा नगरपरिषद) कार्यभार पार पाडतील.

सर्व नियुक्त अधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगाने ठरविलेल्या मार्गदर्शक सूचना तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जारी आदेशांचे तंतोतंत पालन करून नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका २०२५ शांततेत, पारदर्शकतेने व सुव्यवस्थित पार पाडाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहेत.

*******

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुन्हा हँडशेक नाही! भारताच्या हरमनप्रीत कौर, पाकिस्तानच्या फातिमा सना यांनी महिला टी-20 विश्वचषकात नाणेफेक...

एजबॅस्टन येथे ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेतील अ गटातील सामन्यापूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नॉन-हँडशेक धोरण रविवारीही सुरूच राहिले कारण भारताची कर्णधार...

'टीएमसीच्या विभक्त गटाला कोणतीही मान्यता नाकारू': अभिषेक बॅनर्जी यांनी बंडखोरी दरम्यान लोकसभा अध्यक्षांना पत्र...

नवी दिल्ली: तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) नेते अभिषेक बॅनर्जी यांनी रविवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून "टीएमसीच्या विभक्त गटाला मान्यता नाकारण्याचे"...

“अगदी दूरचे पाइन नट देखील खाल्ल्यास गोड लागते”

आपण आयुष्याचा बराचसा भाग वाट पाहत घालवतो. आम्ही स्थिर होण्यासाठी "योग्य वेळेची" वाट पाहतो, आम्ही लांब-अंतरातील अंतर बंद होण्याची वाट पाहतो किंवा शेवटी कोणीतरी...

आवेगपूर्ण नोकरी करू नका, org मध्ये भूमिका बदलण्याचा प्रयत्न करा: अदानी GCC सीईओ विद्यार्थ्यांना...

चित्र केवळ प्रतिनिधित्वाच्या उद्देशाने पुणे : विद्यार्थ्यांना AI ची भीती न बाळगण्याचा आणि सतत शिकण्याचा आणि स्वतःला जुळवून घेण्याचा सल्ला देत, अदानी कॉर्पोरेट...

हँडशेक पंक्ती: T20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू हस्तांदोलन करतील का? हरमनप्रीत कौरने...

भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली की, तिचा संघ पाकिस्तानविरुद्धच्या महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी फक्त क्रिकेटवर केंद्रित आहे आणि संघातील चर्चा केवळ खेळाभोवतीच...

पुन्हा हँडशेक नाही! भारताच्या हरमनप्रीत कौर, पाकिस्तानच्या फातिमा सना यांनी महिला टी-20 विश्वचषकात नाणेफेक...

एजबॅस्टन येथे ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेतील अ गटातील सामन्यापूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नॉन-हँडशेक धोरण रविवारीही सुरूच राहिले कारण भारताची कर्णधार...

'टीएमसीच्या विभक्त गटाला कोणतीही मान्यता नाकारू': अभिषेक बॅनर्जी यांनी बंडखोरी दरम्यान लोकसभा अध्यक्षांना पत्र...

नवी दिल्ली: तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) नेते अभिषेक बॅनर्जी यांनी रविवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून "टीएमसीच्या विभक्त गटाला मान्यता नाकारण्याचे"...

“अगदी दूरचे पाइन नट देखील खाल्ल्यास गोड लागते”

आपण आयुष्याचा बराचसा भाग वाट पाहत घालवतो. आम्ही स्थिर होण्यासाठी "योग्य वेळेची" वाट पाहतो, आम्ही लांब-अंतरातील अंतर बंद होण्याची वाट पाहतो किंवा शेवटी कोणीतरी...

आवेगपूर्ण नोकरी करू नका, org मध्ये भूमिका बदलण्याचा प्रयत्न करा: अदानी GCC सीईओ विद्यार्थ्यांना...

चित्र केवळ प्रतिनिधित्वाच्या उद्देशाने पुणे : विद्यार्थ्यांना AI ची भीती न बाळगण्याचा आणि सतत शिकण्याचा आणि स्वतःला जुळवून घेण्याचा सल्ला देत, अदानी कॉर्पोरेट...

हँडशेक पंक्ती: T20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू हस्तांदोलन करतील का? हरमनप्रीत कौरने...

भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली की, तिचा संघ पाकिस्तानविरुद्धच्या महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी फक्त क्रिकेटवर केंद्रित आहे आणि संघातील चर्चा केवळ खेळाभोवतीच...
error: Content is protected !!