Homeताज्या बातम्याअहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित ४३७ विहिरींसाठी ६३ लाखांचा निधी मंजूर पालकमंत्र्यांच्या हस्ते...

अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित ४३७ विहिरींसाठी ६३ लाखांचा निधी मंजूर पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात निधीचे वितरण

 

अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित ४३७ विहिरींसाठी ६३ लाखांचा निधी मंजूर

पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात निधीचे वितरण

अहिल्यानगर, दि. ५ :- सन २०२५-२६ च्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या जिल्ह्यातील ४३७ शेत विहिरींच्या दुरुस्तीसाठी शासनाने ६३ लाख १० हजार ६८३ रुपयांचा निधी मंजूर करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. या मदतीचे वितरण आज पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सहा शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश देऊन करण्यात आले असून जिल्हाधिकाऱ्यांनी उर्वरित निधीचे वाटप १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

खरीप हंगामात राज्यात व जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी गाळाने बुजल्या होत्या अथवा खचल्या होत्या. यामुळे रब्बी हंगामात पिकांच्या सिंचनासाठी शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली होती. यावर उपाययोजना म्हणून राज्य शासनाच्या नियोजन विभागाने १३ ऑक्टोबर २०२५ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार मदत जाहीर केली आहे. या निर्णयान्वये बाधित विहिरींच्या दुरुस्तीसाठी प्रत्यक्ष आलेला खर्च किंवा कमाल ३० हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल, ती मदत म्हणून देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गटविकास अधिकाऱ्यांमार्फत प्राप्त झालेल्या अहवालानुसार पहिल्या टप्प्यात ४३७ विहिरी पात्र ठरल्या आहेत. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये या निधीचे वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये सर्वाधिक फटका बसलेल्या जामखेड तालुक्यातील १२८ विहिरींसाठी १८ लाख ६८ हजार ७८ रुपये, शेवगावमधील १११ विहिरींसाठी १६ लाख ४८ हजार २०६ रुपये, राहुरीतील ४९ विहिरींसाठी ७ लाख ३२ हजार ८४४ रुपये, श्रीरामपूरमधील ४६ विहिरींसाठी ६ लाख ६० हजार ६०३ रुपये, नेवासा येथील ४३ विहिरींसाठी ५ लाख १० हजार ८६४ रुपये, संगमनेरमधील २१ विहिरींसाठी ३ लाख १४ हजार ७६ रुपये, कोपरगावच्या १२ विहिरींसाठी ४ लाख ४ हजार ४०० रुपये व पारनेरच्या १२ विहिरींसाठी १ लाख ७१ हजार ६१२ रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

या निधी वितरण कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी प्रशासनाला गतीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. उर्वरित सर्व पात्र विहिरींचे प्रस्ताव तातडीने सादर करून येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत सर्व बाधित शेतकऱ्यांना रक्कमेचे वाटप पूर्ण करावे, असे सक्त निर्देश त्यांनी संबंधित गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. यावेळी कृषी विभाग, आत्मा, पशुसंर्वधन विभाग व जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

********

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जेवार विमानतळ: नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ 15 जूनच्या टेक-ऑफसाठी सज्ज आहे: दिल्ली-एनसीआरच्या नवीनतम एव्हिएशन हबकडून...

दिल्ली-NCRवासियांसाठी खुशखबर! एका प्रमुख अपडेटमध्ये, नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ (NIA) किंवा जेवार विमानतळ या 15 जून रोजी उड्डाणासाठी सज्ज आहे. याला भारताच्या विमान...

पुणे धरणाच्या बॅकवॉटरमध्ये सेल्फी काढताना तीन तरुण बुडाले

पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात तीन तरुणांचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. नवलख उंब्रे गावाजवळील...

आर अश्विनने 'एमएस धोनी सारखे' टेम्पलेट जडेजाची सर्वात मोठी T20 मर्यादा म्हणून ध्वजांकित केले

राजस्थान रॉयल्सचा रवींद्र जडेजा (एपी फोटो) भारताचा माजी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने रवींद्र जडेजाच्या फिरकीविरुद्धच्या सावध दृष्टिकोनाबद्दल चिंता व्यक्त केली असून, त्याच्या T20 सामन्यातील...

'आणखी आदेशांची गरज नाही': विशेष SC खंडपीठाने मोजणी कर्मचाऱ्यांवर टीएमसीची याचिका फेटाळली

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी केंद्र सरकार आणि पीएसयू कर्मचाऱ्यांच्या मोजणी पर्यवेक्षक म्हणून नियुक्तीला आव्हान देणारी टीएमसीची याचिका...

7 शक्तिशाली सिद्धांत तुमची इच्छा असेल की तुम्हाला तुमच्या 20 च्या दशकाच्या सुरुवातीस समजले...

जीवनात तुम्हाला सर्व परिस्थितींना सामोरे जावे लागते, प्रथम शांतता ठेवा. काहीवेळा ते विजयासारखे दिसू शकते, परंतु काहीवेळा ते पराभवासारखे दिसू शकते. तथापि, आपल्या कृतींकडे...

जेवार विमानतळ: नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ 15 जूनच्या टेक-ऑफसाठी सज्ज आहे: दिल्ली-एनसीआरच्या नवीनतम एव्हिएशन हबकडून...

दिल्ली-NCRवासियांसाठी खुशखबर! एका प्रमुख अपडेटमध्ये, नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ (NIA) किंवा जेवार विमानतळ या 15 जून रोजी उड्डाणासाठी सज्ज आहे. याला भारताच्या विमान...

पुणे धरणाच्या बॅकवॉटरमध्ये सेल्फी काढताना तीन तरुण बुडाले

पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात तीन तरुणांचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. नवलख उंब्रे गावाजवळील...

आर अश्विनने 'एमएस धोनी सारखे' टेम्पलेट जडेजाची सर्वात मोठी T20 मर्यादा म्हणून ध्वजांकित केले

राजस्थान रॉयल्सचा रवींद्र जडेजा (एपी फोटो) भारताचा माजी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने रवींद्र जडेजाच्या फिरकीविरुद्धच्या सावध दृष्टिकोनाबद्दल चिंता व्यक्त केली असून, त्याच्या T20 सामन्यातील...

'आणखी आदेशांची गरज नाही': विशेष SC खंडपीठाने मोजणी कर्मचाऱ्यांवर टीएमसीची याचिका फेटाळली

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी केंद्र सरकार आणि पीएसयू कर्मचाऱ्यांच्या मोजणी पर्यवेक्षक म्हणून नियुक्तीला आव्हान देणारी टीएमसीची याचिका...

7 शक्तिशाली सिद्धांत तुमची इच्छा असेल की तुम्हाला तुमच्या 20 च्या दशकाच्या सुरुवातीस समजले...

जीवनात तुम्हाला सर्व परिस्थितींना सामोरे जावे लागते, प्रथम शांतता ठेवा. काहीवेळा ते विजयासारखे दिसू शकते, परंतु काहीवेळा ते पराभवासारखे दिसू शकते. तथापि, आपल्या कृतींकडे...
error: Content is protected !!