*प्रखर उन्हाळ्याचा फळबाजारावर परिणाम : आवक घटली, दर वाढले; ग्राहक व विक्रेते दोघेही अडचणीत*—-

*राहाता—यावर्षी नेहमीपेक्षा उन्हाळा मोठ्या प्रमाणात जाणवत असून त्याचा थेट परिणाम फळबाजारावर झाला आहे. *फळांना मागणी कायम असली तरी आवक कमी झाल्याने दर उंचीवर गेले आहेत.*
सध्या बाजारात *आंबा, डाळिंब, केळी, संत्री, मोसंबी, टरबूज, सफरचंद* अशी सर्वच फळे विक्रीस उपलब्ध आहेत व त्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. मात्र दर वाढल्याने *सामान्य जनता फळ खरेदीस धजावत नाही किंवा कमी प्रमाणात खरेदी करत आहे.*
*विक्रेत्यांसमोर दुहेरी संकट*
दर वाढल्याने विक्रेत्यांना जास्त भांडवलाची गरज भासत आहे. दुसरीकडे प्रखर उन्हामुळे *माल शिल्लक राहिल्यास खराब होऊन नुकसान होण्याची शक्यता अधिक* आहे. फळे नाशवंत असल्याने ती लवकर विकणे गरजेचे असते. त्यामुळे *कमी नफा घेऊन किंवा कधी नुकसानीच्या दरातही फळे विकावी लागत आहेत*, असे विक्रेत्यांनी सांगितले.




















