:
ग्रामपंचायत नाळवंडीची बदनामी थांबवावी
नसता कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागेल -सरपंच डॉ. इकबाल पठाण
अंमळनेर दि. १६ (प्रतिनिधी):
दि.१२-१२-२०२५ रोजी विविध वृत्तपत्रामध्ये श्री. अशोक महादेव पठाडे यांनी ग्रामपंचायत नाळवंडी व सरपंच म्हणून माझी चुकीच्या पध्दतीने बातमी प्रसिध्द करुन बदनामी केलेली आहे. ज्यामुळे मला व माझ्या कुटुंबाची विनाकारण मनस्ताव व बदनामी झालेली आहे.आज अनेक स्वयंघोषीत समाजसेवक माहिती अधिकाराचा वापर करुन अधिका-याना अडचणीत आणुन आपला स्वार्थ साध्य करत आहेत. हे सर्वज्ञान आहे. मी व माझे कुटुंब हे नाळवंडी गावामध्ये मागील कित्येक वर्षापासुन सामाजिक व राजकीय कार्यात सक्रीय आहोत. लोकांची दिवस /रात्र सेवा करणे हाच आमचा धर्म आहे. आणि हे सर्व गांवाला व पंचक्रोशीला माहित आहे. आमचे कुटुंब हे अल्पसंख्याक सामाजिक असुनही गावामध्ये बहुसंख्य मराठा समाज असतानाही लोकांनी माझी जनतेमधुन सरपंच म्हणुन निवड केलेली आहे. आणि हे निश्चित सोपे नाही. १ जानेवारी २०२३ रोजी सरपंच पदाचा कार्यभार स्विकारला पासुन नाळवंडी ग्रामपचांयत चा कार्यभार पुर्णतः पारदर्शक ठेवण्याचा मी पुरेपुर प्रयत्न केलेला आहे. वित्त आयोगाची जी काम केलेली आहेत ती सर्व नियमाप्रमाणे झालेली आहेत. तसेच गांवात मागील ३ वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामे झालेली आहेत. तसेच या पुढेही चुकीच्या कामाचे समर्थन माझे कडून होणार नाही.

श्री. अशोक महादेव पठाडे यांनी जी मनरेगा सार्वजनीक कामाची महिती मागणी केलेली आहे.त्यांच्याशी सरपंच म्हणुन माझा वैयक्तीक कसलाच संबंध येत नाही. माहिती उपल करुन देणे संबधी मी ग्रामपंचायतचे ग्रामरोजगार सेवक श्री. डोके एस. आर यांना पत्र दिलेले आहे. आणि संबधीतास माहिती मिळाली नसेल तर त्याने कायदेशीर अपीलाचा मार्ग अवलंबवावा परंतु विनाकराण ग्रामपंचायत किवा सरपंच तसेच गांवाची बदनामी करु नये. नाळवंडी गांवातील दोन व्यक्तीच्या रोजच्या तक्रारी अर्जामुळे व माहिती अधिकार अर्जामुळे या ठिकाणी कोणीही नवीन ग्रामपंचायत अधिकारी येण्यास तयार होत नाही. ज्यामुळे लोकांची जन्म/मृत्यु/विवाह नोंदी व प्रमाणपत्र देण्या संबधी अडचणी निर्माण होत आहेत. तसेच मनरेगा च्या वैयक्तीक शेतक-यांच्या योजना विहीर /शेततळे/घरकुल /
फळबाग इ. चे मस्टर काढता येत नाहीत. यामुळे गावातील लोकांचे/शेतक-यांचे खुप मोठे नुकसान होत आहे. हे सर्व प्रकार न थांबल्यास मी व सर्व ग्रामपंचायत सदस्य संबधीत विघ्न संतोषी लोकां विरुध्द योग्य त्या कायदेशीर कार्यवाहीसाठी २६ जानेवारी २०२६ च्या ध्वजारोहन समारंभ नंतर उपोषण व आंदोलनचा मार्ग अवलंबनार आहोत. कृपया वरीष्ठानी यांची नोंद घ्यावी असे दिलेल्या निवेदनात सरपंच डॉ. इकबाल पठाण यांनी म्हटले आहे.




















