

राहाता-आहिल्या नगर मनमाड या राष्ट्रीय महामार्गावरील राहाता शहरातील खड्यात शिवसेना उबाठा पक्षाने झाडे लावून वृक्ष रोपण केले व पावसाच्या जमलेल्या पाण्यात मतदार यादीच्या कागदांच्या होड्या बनवून सोडल्या.आहिल्या नगर मनमाड या राष्ट्रीय महामार्गाची झालेल्या बिकट परिस्थिती मुळे तीस हजार लोकांचे जीव गेले तर जवळ जवळ दोन लाख लोक आज पर्यंत जायबंदी झाले आहेत.या महामार्गाचे गेल्या अनेक वर्षापासून काम रखडलेले आहे.
गणेश सोमवंशी शिवसेना उबाठा गट राहता शहराध्यक्ष यांनी सांगितले की अहिल्या नगर मनमाड हा महामार्ग दुरुस्ती काम न झाल्यामुळे अनेक ठिकाणी असंख्य मोठ मोठे खड्डे पडल्यामुळे वाहन धारकाना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.या मध्ये निष्पाप लोकांचे रोजच जात असून बळींची संख्या तीस हजार वर पोहचली आहे.जायबंदी ची संख्या दोन लाख पर्यंत पोहोचली आहे.दुचाकी स्वार,छोटी वाहने व मोठी वाहने सर्वांनाच याचा धोका वाढला आहे.
त्यामुळे सरकारने त्वरित दखल घेवून महामार्गाचे काम सुरू करावे शिवसेना उबाठा गट तीव्र आंदोलन करील हा इशारा गणेश सोमवंशी,पदाधिकारी व सर्व कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणा देत दिला.जागतिक दर्जाचे शिर्डी साई बाबा देवस्थाना मुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते.अनेक भाविकांचे ही प्राण या दुरवस्थेतल्या रस्त्या मुळे गेले आहेत.
शिवसेना उबाठा गटाचे नाना बावके,सोमनाथ गोरे (तालुका अध्यक्ष),अमोल गायके,संदीप सोनवणे,गोरख वाकचौरे,सुनील परदेशी,पुंडलिक बावके,दीपक टाक,महेश पाखरे,अमित महाले,अमोल खापटे,आबा आरगडे,गरुड गव्हाणे,सचिन सदाफळ,यश गोर्हे,गंगाधर बेंद्रे इतर शिवसैनिक हजर होते.




















