



मैत्रीचे अमृत! — मित्रांच्या प्रेमाने भारावलेला वाढदिवसाचा सोहळा
मैत्री हा शब्दच माणसाच्या जीवनातील सर्वात सुंदर अर्थ सांगतो — नि:स्वार्थ, प्रेमळ आणि हृदयाला जोडणारा. आपल्या राहाता शहरातील वरिष्ठ पत्रकार राजूभाई पठाण यांनी हीच भावना आपल्या वाढदिवसाच्या माध्यमातून अनुभवली आणि शब्दांत व्यक्त करताना स्वतःच भारावून गेले.
राजूभाई म्हणाले की “माझा वाढदिवस साजरा करण्याचे मन नव्हते. परंतु मागील आठवड्याभरात रोजच तो साजरा होत राहिला. आयुष्यात कधीही इतक्या वेळा आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढदिवस साजरा झाला नव्हता. हे सर्व शक्य झाले ते माझ्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या माझ्या मित्रमंडळींमुळे,” असे भावनिक उद्गार त्यांनी कृतज्ञतेने व्यक्त केले.
या अनमोल स्नेहाचा साक्षीदार झाला राहाता शहर — कारण या साजरीकरणात केवळ औपचारिकता नव्हती, तर होती ती खरी माणुसकी आणि निखळ आपुलकी. मंत्री, खासदार, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, व्यापारी, मित्रपरिवार अशा सर्व क्षेत्रांतील लोकांनी या सोहळ्यात सहभाग घेतला आणि मैत्रीचा सुंदर उत्सव घडवून आणला.
जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील, डॉ. संतोष मैड, डॉ. आशुतोष मैड, डॉ. स्वाधीन गाडेकर, डॉ. किरण गोरे, गणेश जाधव सर (मनसे अध्यक्ष), राधाकृष्ण गोरे, प्रदिप (पप्पू) बनसोडे, विनोद गंभीरे,नितीनभाऊ अष्टेकर टेलर, सुनील वाणी, भाऊसाहेब चौधरी, सुनील निचिते, संदीप लुटे, दिलीप सूर्यवंशी, चेमटे साहेब, माळवदे काका, पारस धाडीवाल, सागर सोमवंशी, राकेश रायसोनी, रामा जाधव, विधिज्ञ् रामनाथ सदाफळ, समीर शेख, पत्रकार ज्ञानेश्वर जोरे, पत्रकार संदीप वाव्हळ, मुश्ताक शहा, अनिल सोमवंशी, पत्रकार दिलीप चोखर, प्रकाश आहिरे, हरिप्रसाद सर, सर्जेराव मते, पुरूषोत्तम गुंजाळ,रवींद्र वैजापूरकर,साइगणेश गव्हाणे,अशरफ शेख,पंढरीनाथ काकडे, भागवत आरने सर, विजय शिंदे, सुदर्शन खैरे, चंद्रकांत फोफळे, जुबेरभाई औरंगाबाद, मन्सुरभाई शेख (लासलगाव), भास्कर खताळे, प्रकाश खताळे, चंद्रभान खताळे, मन्नान शेख, पिंकी धोंगडे (नगर), राजूभाऊ वाघमारे, डॉ. बाप्पूसाहेब पानगव्हाने, डॉ. अंजली पानगव्हाने, डॉ. अजिंक्य पानगव्हाने, जानूभाई पठाण, डॉ. सादेख पठाण, डॉ. इकबाल पठाण, डॉ. बिलकीस आझम, डॉ. फारुख आझम, शमा पठाण, बबलू खरात, अनिल बतरा, वाबळे नाना, हेमंत आणप सर, शेळके साहेब, पत्रकार काशीनाथ घुले (संगमनेर), पत्रकार किरण वाबळे, गणेश भालेराव, पत्रकार जावेद सय्यद, पत्रकार अजय जाधव, अतिक शहा, डॉ. संजय उबाळे, विनोद गाडेकर, दिपक दंडवते, लक्ष्मण खुडे, फिरोज शेख (पोलीस), मनीष चितळकर, दशरथ तुपे, सौ. अनुराधा तुपे (नगरसेविका), पांडूभाऊ तुपे, धनंजय गाडेकर, आलिम शहा, कलीमभाई तंबोलीं,नवनाथ राजे मुजमुले,सतीश शेठ खाँबेकर,देवीदास सोनटके,अभिजीत बोठे — या सर्वांनी मनापासून शुभेच्छा देऊन प्रेमळ साथ दिली.
“माझ्यावर प्रेम करणारे, सुख-दुःखात साथ देणारे, माझ्यावर विश्वास ठेवणारे तुम्ही सर्व माझ्या आयुष्यातील अनमोल संपत्ती आहात. देवाने मला तुम्हांसारखे अष्टपैलू हिरे दिले, हीच माझी सर्वात मोठी कमाई आहे,” असे सांगताना राजूभाई पठाण यांनी भावनिक स्वरात सर्वांचे आभार मानले.
पठाण यांनी पुढे सांगितले, “तुमच्या असण्यानेच माझे आयुष्य परिपूर्ण झाले आहे. नाव चुकून राहिले असेल तरीही प्रत्येकाचे माझ्या हृदयात अमिट स्थान आहे.”
राहाता शहरात साजरा झालेला हा वाढदिवस केवळ एक सोहळा नव्हता — तो होता माणुसकी, आपुलकी आणि खऱ्या मैत्रीचा उत्सव!
























