राहाता तालुक्यातील केलवड-कोहाळे शिवारात एका विहिरीत वडील आणि त्यांच्या चार मुलांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पत्नी नांदायला येत नसल्याने पतीनेच स्वतःसह मुलांचा जीव घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण सुनील काळे (वय 35) यांनी त्यांची मुले शिवानी (8), प्रेम (7), वीर (6) आणि कबीर (5) यांना विहिरीत ढकलून स्वतः आत्महत्या केल्याचा संशय आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील मेहकर येथील अरुण सुनील काळे रहिवासी आहेत.हा व्यक्ती पत्नीला नेहमी मारहाण करत असल्यामुळे पत्नी तिच्या माहेरी येवला येथे आलेली होती.नगर तालुक्यातील एका प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असलेल्या शाळेत या बापाने त्यांची कटिंग करण्याच्या बहाणा करून मुले घेऊन गेला.मुलांच्या आईने शाळेत फोन करून मुले बापाच्या ताब्यात न देण्याचे सांगितले परंतु तो पर्यन सदर व्यक्ती मुले शाळेतून घेऊन गेला होता.
कोर्हाळे बायपास जवळील केलवड हद्दीत शेतीमधील विहिरी जवळ आल्यावर अरुण काळे याने पत्नीस फोन करून नांदवयास येण्याची विचारणा केल्यावर पत्नीच्या नकार आल्यामुळे त्याने चारही मुलाना विहिरीत ढकलून देवून स्वतःही एक हाथ व एक पाय बांधून विहिरीत उडी घेतली असा प्रथम दर्शनी पोलिसांकडून माहिती मिळाली.
घटनेची माहिती मिळताच शिर्डी चे डी वाय एस पी शिरीष वमने,अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आपल्या टीम सह घटना स्थळी पोहोचले.
श्री.सोमनाथ वाकचौरे अप्पर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर,श्री.शिरीष वमने ,उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी,श्री .नितीन चव्हाण पोलीस निरीक्षक,पोहेकॉ / कोरेकर ,पोहेकॉ / गडाख ,गोपनिय कर्मचारी पोना / विनोद गंभीरे ,पो.कॉ/ वाघ ,पोलीस पाटील सुरेश गमे यांच्या सह सर्व टीम व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने राहाता नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाचे प्रमुख अशोक साठे व टीम आणि शिर्डी अग्निशमन दलाचे थोरात साहेब व टीम यांच्या अथक प्रयत्नांनी दुपार पासून ते रात्री आठ पर्यंत पाचही मृतदेह विहरीतून बाहेर काढले.या हृदयद्रावक घटनेने सर्व जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.























