एक अभ्यासू, संवेदनशील, तळमळीचा आणि अजोड नेतृत्वगुण असलेला तसेच राज्याच्या विकासासाठी प्रचंड मेहनत घेणारे नेते म्हणुन देवेंद्रजी फडणवीस यांची राज्यभर ओळख झाली आहे अशी भावना प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.ममता पिपाडा यांनी बोलताना व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त वृक्षारोपणाची मोहीम राबवुन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भाजपा नेते डॉ.राजेंद्र पिपाडा,आरपीआय नेते दिलीपराव वाघमारे, गोरखनाथ पवार,साहील पिपाडा,बाळासाहेब गरुड,आण्णासाहेब धाटबळे आदी यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या राजकारणात तीन वेळा मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणारा एकमेव नेता ठरतोय.संघाचे संस्कार, मातृभूमीची ओढ आणि लोकसेवा हेच देवभाऊंचं जीवनधर्म! 1992 मध्ये अवघ्या २२व्या वर्षी नगरसेवक, २४व्या वर्षी भारतातला दुसरा सर्वात तरुण महापौर…हाच प्रवास पुढे पाच वेळा आमदार, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता, उपमुख्यमंत्री आणि ‘महाराष्ट्राच्या मनातला माणूस’ असा झाला. एलएलबी, बिझनेस मॅनेजमेंट, जर्मनीहून प्रोजेक्ट मॅनेजमेंटचं शिक्षण…हे सगळं त्यांनी केवळ शैक्षणिक मिळकत म्हणून नाही, तर ‘सुशासन’ आणि ‘गतीशील प्रशासन’ तयार करण्यासाठी आत्मसात केलं.
मुख्यमंत्रिपदाच्या काळात त्यांनी महाराष्ट्रात जे जे उत्तम घडवलं ते देशातलं नक्कीच पहिलं ठरलं! योजना अशा, की इतर राज्यांनाही हेवा वाटावा.जलयुक्त शिवार,समृद्धी महामार्ग,आपले सरकार हे केवळ योजनांची नाव नाहीत. तर लोकांच्या आशा, विश्वास आणि सामर्थ्यांचं प्रतिबिंब आहेत. सत्तेत असो वा विरोधात…देवाभाऊंचा आवाज ठाम असतो, भाषा मुद्देसूद असतात आणि मांडणी अभ्यासपूर्ण! म्हणूनच विरोधी पक्षातसुद्धा त्यांचा शब्द सन्मानानं ऐकला जातो. “करोडोंच्या आशा असलेल्या या नेत्यानं महाराष्ट्राच्या मनात आपली जागा निर्माण केलीय. यावेळी उपस्थितांनी देवेंद्रजींना शुभेच्छा व्यक्त केल्या.




















