
नाळवंडीत सरपंच यांच्या व सर्व जाती धर्मांचे तरुण मंडळ आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नातून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा महाकुंभ: हरिनाम सप्ताहात मुस्लिम समाजाकडून महाप्रसाद
नाळवंडी, दि. 20: “धर्म माणसाला जोडतो, तोडत नाही” याचा वस्तुपाठ नाळवंडी गावाने घालून दिला आहे. येथे सुरू असलेल्या 35 व्या भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात गावचे सरपंच यांच्या पुढाकाराने संपूर्ण मुस्लिम समाज व सर्व जाती धर्मांचे तरुणांनी आणि ग्रामस्थ बांधवांनी दि. 26/04/2026 रोजी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाच्या पत्रिकेतच “महाप्रसाद अन्नदाते: संपूर्ण मुस्लिम समाज बांधव ,सर्व जाती धर्मांचे तरुण मंडळ आणि ग्रामस्थ नाळवंडी” असे ठळकपणे नमूद आहे.
याचा प्रत्यय येतो गावातील मशिदीत टिपलेल्या एका छायाचित्रातून. मशिदीत वारकऱ्यांच्या वेशात, डोक्यावर गांधी टोपी व हात जोडून उभे असलेले चिमुकले व त्यांच्यासोबत असलेले मौलवी – हे दृश्य आजच्या भारताला दिशा देणारे आहे. सरपंच यांनी या मुलांना वारकरी संस्कार देत मशिदीत एकत्र आणले.

सरपंच म्हणाले, “19/04/2026 ते 26/04/2026 या काळात सुरू असलेला हा सप्ताह संपूर्ण गावाचा आहे. आम्ही मुस्लिम बांधवांनी महाप्रसादाची जबाबदारी घेतली. मंदिर-मशिदीच्या भिंती असल्या तरी मनात भिंत नाही. हीच नाळवंडीची परंपरा आहे.”
दि. 19 ते 26 एप्रिल दरम्यान चालणाऱ्या या सप्ताहात भावार्थ रामायण कथा, ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन व हरिजागर असे कार्यक्रम होत आहेत. समारोप दिवशी म्हणजे 26 एप्रिल रोजी मुस्लिम समाजाचा महाप्रसाद होणार असून हजारो भाविक त्याचा लाभ घेणार आहेत.
या उपक्रमामुळे नाळवंडी गाव व सरपंच तरुण मंडळ आणि ग्रामस्थांचे,गावाचे नाव संपूर्ण बीड जिल्ह्यात गाजत आहे. “असे सरपंच व असा सलोखा प्रत्येक गावाला मिळो” अशा प्रतिक्रिया उमटत आहे.




















