
महामार्गाचे प्रश्नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष-श्री रामनाथ सदाफळ (पत्रकार)
राहाता – ,दोन दिवसांपूर्वी नगर मनमाड महामार्गावरील स्पीड ब्रेकर वरील वेगाने धावणारी वाहने याबाबतचा प्रश्न गॉड फादर या वृत्तवाहिनी व्दारे मांडण्यात आला होता.राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस श्री रणजीत बोठे पाटील ,अॅड रामनाथ सदाफळ पाटील यांनी प्रश्नावर छेडले असता नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात स्पीड ब्रेकर टाकण्याबाबत मागणी करण्यात आली होती. या महामार्गावर पी जे एस एस स्कूल प्रीतीसुधाजी इंग्लिश मीडियम स्कूल या शाळा असल्याने या ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
देशाचे सहकार मंत्री यांच्या दौरा प्रसंगी प्रोटोकॉल नुसार ठिकठिकाणचे स्पीड ब्रेकर काढण्यात आले होते. त्यामुळे भरगाव वेगाने वाहने धावत असल्याने शाळकरी मुले,अबाल वृद्ध, नागरिक, अंध, अपंग दुर्घर आजार ग्रस्त नागरिकांना रस्ता क्रॉस करणे कठीण झालेले आहे.
या कारणामुळे सामाजिक हेतू लक्षात घेऊन राहाता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना निवेदन देऊन स्पीड ब्रेकर टाकण्याची मागणी करण्यात आली आहे.
या महामार्गावर अनेक लोकांचे अपघात झाले असुन ऐन दिवाळीत मात्र या म
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रणजित बोठे, सामाजिक कार्येकर्ते ऍड रामनाथ सदाफळ, अभिजित बोठे, जाईद भाई दारुवाले, बाळासाहेब गुळवे साहेब, निलेश डांगे, प्रशांत गायकवाड आदींनी निवेदन देऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला.




















